*डोंगरगाव येथून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा शुभारंभ*
सोयगाव प्रतिनिधी संतोष गर्दे
तालुका कृषी अधिकारी कन्नड अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 मध्ये 50 गावांची निवड झालेली असून. मौजे डोंगरगाव येथे गाव विकास सूक्ष्म कृती आराखड्याचा पथदर्शीय प्रकल्प राबवला जात आहे यात गाव पातळीवर लोकसभागीय सूक्ष्म नियोजन प्रक्रिया दिनांक 1/4/2025 ते 7/4/2025 पर्यंत राबवली जात आहे. यामध्ये प्रत्येक दिवशी काय करायचं यांचं नियोजन करण्यात आले आहे त्यामध्ये गावात मशाल फेरी, सायंकाळी गाव बैठक, शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत प्रभात फेरी, लोकसहभागातून गाव नकाशा, शिवार नकाशा, शिवार फेरी करण्यात येणार असून पाण्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे तसेच महिला सभा व ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे.
डोंगरगाव येथून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा शुभारंभ दि. 01 रोजी करण्यात आला यामध्ये सायंकाळी ग्राम कृषी विकास समितीचे अध्यक्ष तथा गावाचे सरपंच पुष्पा आग्रे यांच्या अध्यक्षतेखाली मशाल फिरीचे आयोजन करण्यात आले तसेच सायंकाळी गाव बैठक घेण्यात आली. यामध्ये तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाठ यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली व मार्गदर्शन केले, तसेच प्रकल्प समन्वयक इम्रान शेख यांनी प्रकल्प आराखडा यावर मार्गदर्शन केले, दिपक देशमुख यांनी पाण्याचा ताळेबंद यावर मार्गदर्शन केले. या सूक्ष्म नियोजन प्रक्रियेमध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व मंडळ कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक हे उपस्थित उपस्थित होते व हा आराखडा तयार करण्यासाठी सर्वांचे सहकार्य लागणार आहे . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक दिपक बिरारे यांनी केले व आभार प्रदर्शन उपसरपंच कैलास आग्रे यांनी केले.
तसेच दिनांक 2/4/2025 रोजी गावात शाळेचा विद्यार्थ्या सोबत प्रभात फेरी काढण्यात आली व नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची जनजागृती,प्रचार व प्रसिद्धी प्रभात फेरीच्या माध्यमातून करण्यात आली. तसेच गावाचा संसाधन नकाशा लोकसहभागातून तयार करण्यात आला त्यावर विश्लेषात्मक चर्चा करण्यात आली. यावेळेस गावातील ग्राम कृषी विकास समितीचे सर्व सदस्य गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभात फेरीचे आयोजन व लोकसभागातून गाव नकाशा काढून घेण्यासाठी कृषी सहाय्यक निलेश खाडे, मंडळ कृषी अधिकारी तेजस नंदनवाळ यांनी सहकार्य केले. यानंतर उर्वरित दिवशी शिवार फेरी करण्यात येणार आहें, तसेच महिला सभेचे आयोजन करण्यात येणार आहे व पाण्याचा ताळेबंद तयार करण्यात येणार आहे व शेवटच्या दिवशी ग्रामसभा घेऊन प्रकल्प आराखड्याला मंजुरी देण्यात येणार आहे.